Scientist वैज्ञानिक

भारतीय रसायनशास्त्र : एक रहस्य (भारतीय रसायन शास्त्राचा इतिहास )

मित्रांनो एकविसावे शतक हे विज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. या युगात वावरतांना आजसुद्धा   इंग्रजी मानसिकतेचे अनेक मेकॉलेचे  मानसपुत्र असे म्हणाताना  आढळतील की, प्राचीन भारतातील  भारतीयांना , विज्ञान माहीत नव्हते  भारतीय केवळ त्याचीच उपासना करणारे व कर्मकांडात  अडकले होते. ते विज्ञान समजून घेणारे नव्हते. यात आणखीन भर घालून म्हणतात  की, भारतात विज्ञानाचे ज्ञान इंग्रजांच्या आगमनाने आले, त्याआधी त्यांना काही ज्ञान नव्हते. बर्‍याच तथाकथित इंग्रजी-सुशिक्षित विचारवंतांचे असे मत आहे की, भारतीय धर्मग्रंथ आणि पुस्तकांमध्ये केवळ उपासना पद्धती आणि पौराणिक कथा आहेत. ज्याचा उपयोग होत नाही. या सर्व गोष्टी मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. म्हणुन मी या गोष्टींचा शोध  सुरु केला.  

या शोधातुन मला असे एक-एक पुरातन पण माझ्यासाठी नव-नवीन असणाऱ्या वैज्ञानिक संकल्पना असणाऱ्या गोष्टी माझ्या समोर आल्या. जशा की,  बोट विज्ञान (नाव/बोट निर्मिती), वस्त्रोद्योग, विमानचालन इ. वर अनेक प्रकारची वैज्ञानिक  माहिती आणि पुस्तके भारतात उपलब्ध आहेत. परंतु या लेखात भारताच्या प्राचीन रसायनशास्त्राबद्दल काही तथ्य ठेवले गेले आहेत. जेणे करुन आजच्या तरूणांना हे माहित होऊ शकेल. भारताच्या प्राचीन विज्ञानात रसायनशास्त्राची भूमिका काय होती हे समजण्यास मदत होईल. 

भारतात रसायनशास्त्राची परंपरा खुप प्राचीन परंपरा आहे  . प्राचीन ग्रंथांमध्ये धातू, खनिज, धातूंचीखान, संयुगे आणि मिश्रन(संमिश्र) , मिश्र-धातु बद्दल यांच्याविषयी आश्चर्यकारक माहिती आहे. यामध्ये रासायनिक क्रियामध्ये वापरल्या जाणार्‍या शेकडो उपकरणांचा तपशील देखील आढळला आहे. आजच्या भाषेत रसायनशास्त्राचे ज्ञान ज्याला आपण ‘रसायनशास्त्र’ chemistry म्हणतो त्या प्राचीन काळापासून भारतात आढळतात. आणि असेच काही रसायनशास्त्रज्ञांनी केलेली कार्य खालील प्रमाणे आहेत: –

  • वाग्भट्ट – रसरत्न समुच्चय
  • गोविंदाचार्य – रसार्णव
  • यशोधर – रस प्रकाश सुधाकर
  • रामचन्द्र – रसेन्द्र चिंतामणि
  • सोमदेव – रसेन्द्र चूड़ामणि
  • नागार्जुन – रसरत्नाकर ,कक्षपुटतंत्र, आरोग्य मंजरी, योग सार, योगाष्टक 

रसरत्न या ग्रंथामध्ये दहा मुख्य रस (चव)मानल्या  आहेत,

(१) महारस (२) उपरस (३) सामान्यरस (४) रत्न (५) धातु (६) विष (७) क्षार (८) अम्ल (९) लवण (१०) लौहभस्म.

त्याचप्रमाणे 10 हून अधिक विषांचे भारतीय रसायनशास्त्रात वर्णन केले गेले आहे.

पुरातन काळात प्रयोगशाळेच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात  :

 रसरत्न समुच्चय ग्रंथात  सातव्या अध्यायात प्रयोगशाळॆत साहित्याची मांडणी कशा प्रकारे करतात याची सविस्तर  माहितीचा अराखडा यात दिला आहे. आणि एवढेच नाही ३२ पेक्षा जास्त वेगवेगळे यंत्र ही वापरले जात होते. त्यातील काहींची नावे खालील प्रमाणे आहेत.  

(१) डमरू यंत्र (२) कच्छप यंत्र  (३) पाटन यंत्र (४) अधस्पदन यंत्र (५) ढेकी यंत्र (६) बालुक यंत्र (७) तिर्यक्‌ पाटन यंत्र (८) विद्याधर यंत्र (९) धूप यंत्र (१०) कोष्ठि यंत्र (११) स्वेदनी यंत्र (१२) दोल यंत्र

    नागार्जुनने प्रयोगशाळेत पारा(mercury) या धातूवर बरेच प्रयोग केले.  त्यांनी पारा शुद्धीकरण करण्याच्या पद्धती व त्याचा औषधी उपयोग समजावून तपशीलवार सांगितला आहे. आपल्या ग्रंथांमध्ये नागार्जुनने वेगवेगळ्या धातूंचे मिश्रण तयार करणे, पारा व इतर धातूंचे निष्कर्षण करणे, महारस (महारस – रस शास्त्र  मध्ये संख्या आठ मानली गेली आहे जे की खालील प्रमाणे अभ्रक – Mica, वैक्रान्त -Tourmaline, माक्षिक -Pyrite ,विमल -Iron Pyrite, शिलाजीत -Black Bitumen, सस्यक  -Copper Sulphate, चपल -Bismuth ,रसक -Calamine or Zinc) परिष्कृत करणे आणि विविध धातूंचे सोने किंवा चांदीमध्ये रूपांतर करण्याची पद्धत दिली आहे. पाराच्या वापराने केवळ धातूंमध्ये  बदल केले गेले नाहीत तर शरीर निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी देखील ते वापरले गेले आहे . भारतातील पारद समिश्रावर आधारित रसायन विद्या  आपल्या पुर्ण विकसित स्वरूपात  पुरुष-स्त्री  प्रतीकवादाशी पूर्णपणे स संबंधित आहे. पारा हा शिव घटक मानला जातो आणि गंधक (Sulphur )हा पार्वती घटक मानला जातो. जेव्हा हे दोन हिंगुळ ( सिन्नाबार, रेड सल्फाइड HgS)  एकत्र केले जाते तेव्हा जो पदार्थ तयार होतो त्याला रससिंदूर किंवा आनंदसूत म्हणतात. हा रससिंदूर आयुष्य वाढवणारा मानला जातो.

रससिंदूर बनवण्याची कृती : – सहापट गंधक जिरविलेल्या पाऱ्याचा हा कल्प आहे. प्रथम पारा बचनागाच्या चटणीत खलून, वांग्यात मसाला भरतो त्याप्रमाणे धोत्र्याच्या फळांत तो भरून कापडाच्या झोळीत तो कुचल्याच्या काढ्यात २४ तास शिजवावा, नंतर पारा वेगळा काढून पुन्हा याप्रमाणेच दोनदा करून, त्यात सहापट गंधक जिरवून रससिंदूर करावा.

   रसरत्न या  ग्रंथामुळे  शास्त्रातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा  होतो की, रसायनशास्त्रज्ञांनी धातू आणि खनिजांमध्ये असणारे  हानिकारक गुणधर्म काढून टाकण्यासाठी व  त्यांचा शरीरात आजारांवर उपयोग  करण्यासाठी, त्यांना  योग्य उपयुक्त  बनवण्यासाठी विविध शुध्दीकरण प्रक्रियेचा वापर केला. यामध्ये, पाऱ्यावर  अठरा संस्कार म्हणजेच शुध्दीकरणाच्या प्रक्रियेमधून जावे  लागते . या प्रक्रियांमध्ये, औषधी वनस्पतींच्या रस,  पाराचे घर्षण आणि सल्फर, अभ्रक, एस्बेस्टोस आणि काही अल्कली पदार्थांसह पारा यांचे मिश्रण प्रमुख आहे. रसनशास्त्रज्ञांना  असा विश्वास आहे की पाऱ्याचे रूपांतर करण्याच्या सर्व शक्तींचे (सोने किंवा चांदीच्या स्वरूपात) अनुक्रमे सतरा शुद्धीकरण प्रक्रियेनंतर तपासले जाणे आवश्यक आहे. जर चाचणी बरी  झाली असेल तर ती अठराव्या शुध्दीकरणाच्या प्रक्रियेत लागू करावी. यामुळे पाराचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता प्राप्त होते. त्याचप्रमाणे, भारतात धातूंवर उपचार करण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात होत्या.

भारतातील रसायनशास्त्राचा इतिहास:

कोणत्याही देशात, विद्वानांच्या विशिष्ट ज्ञानाच्या परंपरेचा  उगम आणि विकास हा  तीन प्रकारच्या  गोष्टींवर अवलंबून   असतो 

  1. त्याठिकाणचे प्राचीन साहित्य.
  2. पारंपारिक ज्ञान .
  3. पुरातत्व पुरावे.

म्हणूनच तर , भारतामध्ये रसायनशास्त्राच्या आरंभिक इतिहासाचे निर्धारण करण्यासाठी विशाल अशा संस्कृत साहित्याचा अभ्यास  करणे गरजेचे आहे .

वेदांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, वेद हे पृथ्वी वरील सर्वात प्राचीन ज्ञानाचा स्रोत आहेत.  एकुण चार वेदांपैकी सर्वात प्राचीन ऋग्वेद आहे. इसवीसनाची सुरवात येशूच्या जन्मानंतर झाली आणि जवळपास १८व्या   शतकापर्यंत फक्त  तांबे (Copper)  ,सोने( gold) , चांदीस (Silver),  लोह (iron) , टिन  , शिसं (लीड), पारद   आणि विशेष बाब सांगायची झाली तर, या सर्वांची माहीती आपल्या प्राचीन अशा संस्कृत साहित्यात सापडते. ज्यात  ऋग्वेद, यजुर्वेद और अथर्ववेद  यांचा समावेश होतो . वेद  हे येशुंच्या जन्माआगोदर पासून अस्तित्वात आहेत. आणि या वेदांच्या आधारानेच धातूंचा  अभ्यास भारतामध्ये केला जात होता . आणि यापासूनच धांतूंच्या माहितीवर आधारित असणाऱ्या रसनशास्त्राचा पाया भारतात रोवला गेला. 

त्याचप्रमाणे, वैदिक काळा नंतर जगातील प्रसिद्ध ऋषी चरक आणि सुश्रुत संहितांमध्ये, औषधी प्रयोगांसाठी शुद्ध धातू व त्यांचे मिश्र धातु त्यांचे मिश्रण स्वरूपात औषधे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक प्रक्रिया, जसे की द्रवीकरण, ऊर्धपातन, या रासायनिक प्रक्रिया उन्नती इत्यादींचे तपशीलवार आणि वाजवी वर्णन सापडले आहे. अर्थात, या प्रकारचे शिक्षण त्यापूर्वीच प्रारंभ झाले असावे.  या ग्रंथांचे लिखान   करणाऱ्याचे कार्य वाखण्याजोगे आहे.

त्याच काळात (इ. स. पूर्व तिसरे शतक.), कौटिल्य (चाणक्य) यांनी त्यांचा ‘अर्थशास्त्र‘ हा सुप्रसिद्ध ग्रंथ रचला होता. ज्यामध्ये धातू, खनिज, खनिजे आणि मिश्रणाशी संबंधित अतिशय अचूक माहिती आहे. त्यांचे खाणकाम, ड्रिलिंग, खाणांचे व्यवस्थापन आणि धातुशास्त्र यांचे आश्चर्यकारक स्पष्टीकरण आढळले आहे. हे पुस्तक भारतातील या प्रकारच्या वैज्ञानिक ज्ञानाचे सर्वात जुने उदाहरण देते. पहिल्या सहस्र वर्षाच्या दुसर्‍या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत अशा पुस्तकांची भरभराट आहे. जी पूर्णपणे रसायनशास्त्रावर आधारित आहेत. ज्यात रासायनिक प्रक्रिया व प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन आहे. यामध्ये खनिजे, धातूंचे, धातूशास्त्र, धातूंचे मिश्रण, उत्प्रेरक, सैद्धांतिक आणि प्रयोगात्मक रसायने आणि त्यात वापरण्यात येणारी शेकडो उपकरणे यांची माहिती अत्यंत विस्तृतपणे  समाविष्ट आहे.

दुसर्‍या शतकात नागार्जुनने लिहिलेले पुस्तक ‘रस रत्नाकार’ या बद्दल असे मानले जाते की सहाव्या शतकात जन्मलेल्या याच नावाच्या बौद्ध रसायनशास्त्रज्ञाने या पुस्तकाचे पुनरावलोकन केले . म्हणूनच हे पुस्तक दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. काहीही असो, या पुस्तकात स्वतः रसायनशास्त्राचे तत्कालीन अफाट ज्ञान लपलेले आहे. सहाव्या शतकात स्वतः, वराहमिहि त्याच्या ‘वराह संहिता’ मध्ये शस्त्रे बनवण्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे पोलाद उत्पादन पद्धतीचे वर्णन केलेले आहे. भारतीय पोलादाची गुणवत्ता इतकी उच्च होती की त्यांच्याकडून तलवारी पर्शिया व इतर देशांत निर्यात केल्याचे ऐतिहासिक पुरावे आढळतात..

 आठव्या शतकापासून बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत 

 वाग्भट्ट यांचे अष्टांग हृदय, 

गोविंद भगवत्पाद  यांचे रस हृदयतंत्र व रसार्णव,

 सोमदेव  यांचे रसार्णवकल्प वं रसेंद्र चूणामणि ,

 गोपालभट्ट  रसेंद्रसार संग्रह तथा

 अन्य पुस्तके रसकल्प, रसरत्नसमुच्चय, रसजलनिधि, रसप्रकाश सुधाकर, रसेंद्रकल्पद्रुम, रसप्रदीप तथा रसमंगल वगैरे भारतात रचले गेलेले ग्रंथ आहेत. 

इ .स. १८०० मधील , ब्रिटीश कागदपत्रांनुसार, सुमारे २०,००० भट्टे विविध धातू मिळविण्यासाठी वापरण्यात आले, त्यातील दहा हजार लोखंडी भट्टी होती आणि त्यामध्ये ५००,००० कामगार कार्यरत होते. स्टील उत्पादनाची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट मानल्या जाणार्‍या स्वीडनच्या स्टीलपेक्षा आणखी उच्च होती. सागरच्या तत्कालीन नाणे निर्मिती कारखान्याचे ब्रिटिश व्यवस्थापक, कॅप्टन प्रेसग्रेन आणि आणखी एक इंग्रज मेजर जेम्स फ्रँकलीन हे साक्षीदार आहेत. त्याच वेळी किंवा त्यानंतर ही  बरेच काळ, साबण, तोफा,युद्धासाठीची दारू , नीळ , शाई, गंधक , तांबे, जस्त इत्यादी रासायनिक आधारित इतर अनेक वस्तू देखील भारतीय तंत्रज्ञानाने तयार केल्या जात असत. परंतु या नंतरच्या , ब्रिटीश राजवटीत पाश्चात्य तंत्रज्ञानाच्या विकासासाठी व त्यांचा माल  भारतात विकला जावा यासाठी भारतीयांचे उद्योगधंदे रसातळाला नेऊन ठेवले. व हळूकळू   भारतीय लोकांना या  तंत्रज्ञानाचा विसर पडत गेला.

निष्कर्षः

ही काही उदाहरणे आहेत ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की, हजारो वर्षांपासून भारताला रासायनिक विज्ञानाची एक  अद्भुत, अप्रतिम परंपरा आहे. परकीय आक्रमणकर्त्यांचे हल्ले आणि गुलामीच्या काळात संस्कृत साहित्याचा नाश यामुळे ही परंपरा कमी झाली. आज संस्कृतच्या जुन्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आधुनिक विज्ञानाच्या काही लोकांना सोबत घेण्याची गरज आहे. त्यांच्याकडून शिकल्यानंतर रसायनशास्त्र आणि आयुर्वेदाच्या संशोधनाला भारताच्या भौगोलिक स्थिती आणि निसर्गाच्या अनुषंगाने प्रोत्साहित केले जावे. संस्कृत आणि भारतीय ग्रंथांकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताचे मौल्यवान विज्ञान आणि आश्चर्यकारक ज्ञान आज पुरातन ग्रंथालयांमध्ये धूळ खात पडले आहेत . अशी आशा आहे की भारत सरकार याकडे लक्ष देईल आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. आजच्या युगात, प्राचीन ज्ञानाचे आवश्यक तेवढे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण जे लोक नूतनीकरणाच्या वादळामध्ये प्राचीन ज्ञानाचे रक्षण करीत नाहीत त्यांना पुन्हा तेच ज्ञान मिळविण्यासाठी भविष्यात बरीच वर्षे शिकण्यासाठी वाया घालवावी लागतील.

13 Replies to “भारतीय रसायनशास्त्र : एक रहस्य (भारतीय रसायन शास्त्राचा इतिहास )

Leave a Reply to Aryan naikwade Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.